प्रिय मित्रांनो,
संगणक युगात ग्रामीण भागातील युवकांनी सरकारी नोकरी व स्पर्धा परीक्षेत जास्तीत-जास्त संख्येने सहभागी होण्याकरिता उपलब्ध असलेल्या संधी त्यांच्यापर्यंत पोहचवून ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग सुलभ व्हावा म्हणून अतिशय प्रतिकूल आणि कठीण परिस्थितीत ‘डी आय आय टी नोकरी मार्गदर्शन केंद्र’ ची स्थापना केली या वेबसाईट च्या माध्यमातून तरुणांना नौकरीची माहिती मिळू लागली सन २०१३ साली परंडा येथे संगणक व्यवसाय सुरु केला आम्ही लावलेल्या एका छोट्याशा रोपट्याचं आज महाकाय वटवृक्षात रुपांतर झाले असून या वटवृक्षाच्या पारंब्या दिवसेंदिवस अवघ्या जगभरात पसरल्या जात आहेत. केवळ राज्य आणि देशातूनच नाही तर संपूर्ण जगभरात विखुरलेले लाखो बेरोजगार याचा लाभ घेऊन नोकरीच्या संधीच्या वाटेवर येत असल्याने महाराष्ट्रभर दिसत आहे मागास मराठवाडा आणि त्यात दुष्काळी धाराशिव सारख्या ग्रामीण जिल्ह्याची स्पर्धात्मक ओळख निर्माण होताना पाहून मनस्वी आनंद होत आहे. त्यामुळे भविष्यात बेरोजगारी निर्मुलन करण्याबरोबरच बेरोजगारांना संघटीत करून न्याय मागण्यासाठी संघर्ष करण्याचा आमचा मानस आहे.
धाराशिव जिल्ह्यात असलेल्या परंडा तालुक्यातील डोंजा तांदुळवाडी मध्ये असणारे देऊळगाव या साधारणतः सहाशे -सातशे लोकवस्तीच्या छोट्याशा खेडेगावात माझा जन्म झाला असला तरी आणि आई- वडिलांचे शिक्षण केवळ पूर्व प्राथमिक पर्यंतच झाले असले तरी आपल्या तिन्ही मुलांनी खूप शिक्षण घेऊन किमान एका मुलाने तरी सरकारी नोकरी करून आपल्या जीवनाचे आणि केलेल्या कष्टांचे सार्थक करावे, असे स्वप्न उराशी बाळगून अतिशय काबाड- कष्ट करून संसारात झगडत- झगडत अगदी विश्वासाने आमच्या शिक्षणासाठी अटोकाट प्रयत्न करून शिक्षण पूर्ण केले, दोन्ही भावांप्रमाणे मी सुद्धा पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करावे, यासाठी ते अपार प्रयत्न करत होते.मी घरातील मोठा मुलगा होतो त्यामुळे आई वडिलाच्या खूप अपेक्षा होत्या कि पोरांनी नौकरी करावी कारण मी दिव्यांग होतो , भविष्यात कसे होणार असे अनेक प्रश्न सतावत होते . मी दहावी , बारावी व डी टी एड चे शिक्षण पूर्ण केले . घरच्या परिस्तिथी मुले मी काही काळ ‘रोजगार हमी योजना’ च्या कामावर हजर झालो, रोजगार हमी योजनेवर काम करताना आपली दयनीय अवस्था स्वतःलाच सहन न झाल्याने सुरुवातीला परंडा येथे कॉम्पुटर सेंटर चालू केले. या मध्ये अनेक वेगवेगळे काम करून अनेक वाईट अनुभव घेत सेंटर चालवले
. माझी संकल्पना नवीनच असल्याने त्यावेळी अनेकांची कुचेष्टा सहन करावी लागली असली तरी, आज आम्ही आकाशाला गवसणी घालण्या इतपत यश मिळविण्यात यशस्वी झालो आहोत, यात शंकाच नाही.
वयाच्या २१ वर्षापर्यंत पराकोटीचे प्रयत्न करूनही दारोदार फिरताना नको वाटणाऱ्या जीवनातील झालेल्या वेदना आजही अगदी जिवंत आहेत. दहावी नंतर शिक्षण सोडण्याचा एक चुकीचा निर्णय आणि स्वतःची क्षमता कधी पडताळून पाहण्याची संधीच न मिळाल्याने ऐन उमेदीच्या काळातील तब्बल सतरा वर्ष केवळ भटकंती करण्यातच गेली. मात्र ‘आत्मविश्वास आणि प्रयत्न नेहमीच यशाकडे घेऊन जातात’ अशीच माझी परिस्थिती झाली असंच म्हणावं लागेल. स्वतः वर विश्वास ठेवा कारण प्रत्येकालाच एक संधी मिळत असते, मात्र मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी गरज आहे ती फक्त आपल्या जिद्द, कृती आणि इच्छा शक्तीची !!
आपला
तानाजी दत्तात्रय घोडके